“१९९९ साली विधानसभेची निवडणूक लवकर घेऊ नये असं मलाही वाटतं होतं. पण बाळासाहेबांच्या सूचनेनुसार मी विधानसभा निवडणूक लवकर घेण्याचा निर्णय घेतला. निवडणुका लवकर घेतल्या पाहिजेत असे प्रमोद महाजन यांचे मत होते. त्या संदर्भात त्यांची बाळासाहेबांबरोबर चर्चा सुद्धा झाली होती” असे नारायण राणे यांनी लोकसत्ता वेब संवादामध्ये सांगितले.