राज्यातील शेतकरी वर्गाचे पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आपला पोशिंदा जगला पाहिजे यासाठी राज्य मंत्रिमंडळानं राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी भाजपाचे राज्यसभा खासदार संभाजीराजे यांनी पत्रकार परिषदेत केली. तसेच राज्याने नुकसान भरपाईबाबत केंद्राकडे मदतीची मागावी करावी. याची जबाबदारी माझ्याकडे द्यावी, मी केंद्रात आवाज उठवेल, असेही संभाजीराजे यावेळी म्हणाले.