तांडव या वेबसिरिची कथा आणि त्यामधील काही दृष्यांवरुन सुरु झालेल्या वादानंतर तांडवच्या टीमकडून यासंदर्भात माफी मागण्यात आली आहे. मात्र माफी हा आमचा मोठा विजय असला तरी तांडवच्या संपूर्ण टीमला तुरुंगात डांबल्याशिवाय मी शांत बसणार नाही, असं भाजपाचे नेते राम कदम यांनी म्हटलं आहे.