Jitendra Awhad: “महिला, भगिनींना बुद्धिमत्ता नाहीये का?”; ‘द केरला स्टोरी’ वरून आव्हाड आक्रमक
‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट पाच मे रोजी प्रदर्शित झाला असून या चित्रपटावरून वातावरण चांगलंच तापलं आहे. या चित्रपटावरून विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने आले आहेत. चित्रपटावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असतानाच आता या वादात राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उडी घेतली आहे. “‘द केरला स्टोरी’ चित्रपटामध्ये ‘केरळमधून 32 हजार महिला बेपत्ता आहेत असं दाखवलं आहे पण खरा आकडा केवळ तीन असल्याचं त्यांनी म्हटलं, त्याचसोबत सर्वात जास्त इंग्लिश मध्ये पीएचडी कुठे झाल्या असतील तर त्या केरळात झाल्या असतील हे न दाखवता ३२ हजार पोरींनी धर्मांतर केलं आहे असं आपण दाखवतो तेव्हा आपल्या महिलांना, बहिणींना अक्कल नाही असं आपण दाखवतो” असा आरोप आव्हाडांनी केला