देशभरात विरोधकांची एकजूट करण्याकरता बैठकांना जोर आला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल आज मुंबई दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्यासोबत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मानसुद्धा उपस्थित होते. या दोघांनीही ठाकरे कुटुंबियांची भेट घेऊ चर्चा केली. त्यानंतर संयुक्त पत्रकार परिषद घेऊन सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

















