बिपरजॉय वादळाच्या फटक्यामुळे मान्सून राज्यात उशिरा दाखल झाला. ऐरवी केरळमार्गे महाराष्ट्रात दाखल होणारे मान्सूनचे वारे यावेळी बंगालच्या उपसागरातून दाखल झाले. त्यामुळे मुंबईआधी मान्सूनचे पूर्व विदर्भात २४ जून रोजी आगमन झाले. परंतु या पावसामध्ये आता खंड पडणार असल्याची शक्यता हवामान अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.