पुणे अपघात प्रकरण सध्या तापलं आहे. या प्रकरणी आता स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी बाल न्याय मंडळाने घेतलेल्या निर्णयावर आश्चर्यचही व्यक्त केलं आहे. तसंच या प्रकरणी कठोर कारवाईची ग्वाही दिली आहे.