India Pakistan War Tensions: पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी पाकिस्तानमधून आलेल्या दहशतवाद्यांनी भीषण हल्ला केला. यात २६ भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर देशभरातून संतप्त भावना व्यक्त केल्या जात होत्या. गेल्या १५ दिवसांत या मुद्द्यावरून देशभरातील वातावरण तापल्याचं दिसून आलं. या पार्श्वभूमीवर मंगळवारी मध्यरात्रीनंतर अर्थात ७ मे रोजी पहाटे भारतीय हवाई दलानं पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरच्या परिसरातील दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केला. या एअर स्ट्राईकला भारतानं ‘ऑपरेशन सिंदूर’ असं नाव दिलं. याच ऑपरेशन सिंदूर मध्ये भारताने ज्या ठिकाणी हल्ला केला
त्या ९ ठिकाणी घडलेल्या कुकर्मांचा पाढा कर्नल सोफिया कुरेशी यांनी वाचून दाखवला आहे.