India vs Pakistan Tension Raised, Which Airports are Closed: जम्मूमधील अनेक शहरांना लक्ष्य करून गुरुवारी रात्री पाकिस्तानकडून डागण्यात आलेल्या क्षेपणास्त्रांना भारताने रोखण्यात भारतीय लष्कराला यश मिळाले आहे. या दरम्यान नागरी उड्डाण मंत्रालयाने उत्तर भारतातील किमान २४ विमानतळांवर पुढील सूचना येईपर्यंत नागरी उड्डाणे स्थगित करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.
ऑपरेशन सिंदूर अंतर्गत खबरदारीच्या उपाययोजनांचा एक भाग म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे. ऑपरेशन सिंदूरद्वारे सशस्त्र दलांनी गेल्या महिन्यात २६ जणांचा बळी घेणाऱ्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी बुधवारी पाकिस्तान व पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ले केले होते.