मुंबईत २६ मे रोजी झालेल्या संततधार पावसामुळे आणि मेट्रो स्थानकाच्या एका प्रवेशद्वाराचं काम सुरु असल्यामुळे वरळी येथील आचार्य अत्रे मेट्रो स्थानकात पाणी शिरलं. भविष्यात अशी घटना घडू नये यासाठी कायमस्वरुपी यंत्रणा उभारण्यात येत आहे, अशी माहिती मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी दिली आहे. तसंच मुंबईतल्या भुयारी मार्गानं प्रवास करत असताना भीती किंवा संशय मनात बाळगू नका, असं आवाहन अश्विनी भिडे यांनी केलं आहे.