बहुजनांनी छत्रपती शिवराय, राजर्षी शाहू, महात्मा फुले, डॉ. आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासारख्या महापुरुषांपासून प्रेरणा घेऊन बहुजन एकतेसाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मत प्राचार्य डॉ. विलास पवार यांनी केले. बळीराजा सन्मान पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी व्यंकाप्पा भोसले होते.
दसरा चौकातील चित्रदुर्ग मठातील महात्मा बसव केंद्राच्या पटांगणात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते धनाजीराव जाधव, वस्ताद पंडित पोवार, डॉ. जयश्री चव्हाण यांना बळीराजा सन्मान पुरस्कार देऊन गौरवले.  
बळीराजाच्या प्रतिमेची बिंदू चौकातून मिरवणूक निघाली. या वेळी माजी महापौर शिवाजीराव कदम, वसंतराव मुळीक, प्रा. शहाजी कांबळे, आनंदा राणे, विनय कांबळे, बाळासाहेब भोसले, सुभाष देसाई, दगडू भास्कर, डॉ. माधुरी चौगुले यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले. स्वागत बबन रानगे यांनी, तर प्रास्ताविक प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार यांनी केले. पुरस्कारप्राप्त मान्यवरांची ओळख प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील यांनी करून दिली. आभार दिगंबर लोहार यांनी तर सूत्रसंचालन संजय गुरव यांनी केले.  

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hardwork should be there for unity