आंघोळीसाठी बंधाऱ्यात उतरलेल्या दोघा अल्पवयीन मुलींना खोलीचा अंदाज न आल्याने प्राण गमवावे लागल्याची घटना अक्कलकुवा तालुक्यात घडली.
तालुक्यातील उमरागव्हाण गावाजवळ अंबारीबारपाडा आहे. या गावाजवळच कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे. कालूबाई गिरमी वळवी (१२) ही इयत्ता सहावीत असणारी विद्यार्थिनी आपली चुलत बहीण इयत्ता तिसरीत शिकणारी कुवीबाई बोक्या वळवी (९) हिच्यासह रविवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास बंधाऱ्यावर आंघोळीसाठी गेली होती. बराच वेळ झाला तरी दोघी बहिणी आढळून न आल्याने ग्रामस्थांनी शोधाशोध सुरू केली असता बंधाऱ्यात त्या बुडाल्याचे आढळून आले. ग्रामस्थांनी मृतदेह बाहेर काढले. या विद्यार्थिनी जिल्हा परिषद शाळेतील होत्या की आश्रमशाळेतील, यासंदर्भात माहिती मिळू शकलेली नाही. मोलगी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 04-12-2012 at 01:59 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sisters died in dam