भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील बांदा हे गेल्या २४ तासांत ४७ अंश सेल्सिअस तापमानासह सर्वात उष्ण असणारे शहर ठरले आहे. शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या हवामान बुलेटिनमध्ये, मेटने ४४ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान असलेली शहरं सूचीबद्ध केली आहेत. यातील बहुतांश ठिकाणे राजस्थान, पूर्व आणि पश्चिम मध्य प्रदेश, बिहार, झारखंड, तेलंगणा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ, सौराष्ट्र-कच्छ आणि गुजरात विभाग, पश्चिम आणि पूर्व उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्ली, तसेच ओडिशा इथली आहेत.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
२९ एप्रिल रोजी भारतातील सर्वात तापमान असलेली शहरं
- बांदा (उत्तर प्रदेश): ४७.४° से
- प्रयागराज (उत्तर प्रदेश): ४६.८ अंश से
- श्रीगंगानगर (राजस्थान), चंद्रपूर (महाराष्ट्र): ४६.४° से
- नौगोंग (एमपी), झांसी (उत्तर प्रदेश): ४६.२° से
- नजफगढ आणि पीतमपुरा (दिल्ली), गुरुग्राम (हरियाणा): ४५.९° से.
- डाल्टनगंज (झारखंड), रिज (दिल्ली): ४५.७° से
(हे ही वाचा: Photos: ‘ही’ पाच देसी पेय तुम्हाला उन्हाळ्यात करतील रिफ्रेश!)
आयएमडीचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा म्हणाले की, संपूर्ण भारतातील एप्रिलमध्ये सरासरी तापमान ३५.०५ अंश होते, जे १२२ वर्षांतील चौथ्या क्रमांकाचे सर्वोच्च तापमान होते.
First published on: 02-05-2022 at 15:47 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hottest cities in india check maharashtra heatwave updates ttg