शस्त्रसंधी कराराचे उल्लंघन करून पाकिस्तानच्या सैन्याने भारत-पाकिस्तान सीमेवरील पूंछ जिल्ह्य़ात रॉकेटचा मारा केल्याचे संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले.पूंछ जिल्ह्य़ातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील नांगीटाकरी विभागात पाकिस्तानने भारतीय ठाण्यांवर तीन ते चार रॉकेट्स डागली. जवळपास १५ मिनिटे धुमश्चक्री सुरू होती. मात्र यामध्ये जीवितहानी झाली नाही, असेही प्रवक्ता म्हणाला.
गेल्या वर्षभरात पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचा ७१ वेळा भंग करण्यात आला आणि त्यामध्ये करण्यात आलेल्या हल्ल्यात सात जण ठार आणि १५ जण जखमी झाले, असेही प्रवक्ता म्हणाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pak violates ceasefire again