आसिफ बागवान
तंत्रज्ञान, वैद्यकीय अशा क्षेत्रांसाठी भारत हा कुशल मनुष्यबळ पुरवणारा देश आहे. देशांतर्गत रोजगाराच्या संधी पुरेशा नसल्यामुळे भारतातील अनेक प्रज्ञावंत तरुण परदेशाची वाट धरतात, हेही नवे नाही. या ‘ब्रेन ड्रेन’वर अधूनमधून चर्चाही होत असते. मात्र, भारतीयांची बुद्धिमत्ताच नव्हे, तर कृत्रिम प्रज्ञेचाही वापर परदेशात अधिक होऊ लागला आहे. मायक्रोसॉफ्टच्या जोडीने बेन अ‍ॅण्ड कंपनी आणि इंटरनेट अ‍ॅण्ड मोबाइल असोसिएशन ऑफ इंडिया (आयएएमएआय) यांनी केलेल्या एका अहवालानुसार आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) अर्थात कृत्रिम प्रज्ञा तंत्रज्ञान क्षेत्रातील एकूण कुशल मनुष्यबळामध्ये भारताचा वाटा तब्बल १६ टक्के इतका आहे. या बाबतीत भारत जगात तिसरा आहे. विशेष म्हणजे, जागतिक ‘एआय’ बाजारपेठेत जेमतेम एका टक्क्याचे योगदान असताना ‘एआय’ तंत्रज्ञानात मात्र भारतीयांची गुणवत्ता तोडीस तोड मानली जात आहे.

Continue reading this story with Loksatta premium subscription
Already a subscriber? Sign in

अहवाल नेमके काय सांगतो?  

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained india dominates artificial intelligence technology technology medical efficient print exp 0722 ysh
First published on: 02-07-2022 at 00:02 IST