शहराजवळ, सोलापूर रस्त्यावरील वाळुंज फाटय़ावर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास कंटेनरची मोटारसायकलला धडक बसून हा अपघात झाला.
दशरथ सुदाम पवार (वय २४), त्यांची पत्नी बाईजाबाई दशरथ पवार (१९) व भाऊ मनोज सुदाम पवार (२२, तिघेही रा. लोणी व्यंकनाथ, श्रीगोंदे) अशी मृत्युमुखी पडलेल्या तिघांची नावे आहेत. हे तिघेही मोटारसायकलवर (एमएच २० सीपी ३९७) नगरकडून गावाकडे जात होते. समोरून येणाऱ्या कंटेनरची (एचआर ५५ एफ ५३६) त्यांना धडक बसली. कंटेनर रस्त्याच्या चुकीच्या बाजूने जात होता, असे पोलिसांनी सांगितले. अपघात वाळुंज फाटय़ाजवळील साईराम धाब्यासमोर झाला.
पवार कुटुंबातील तिघेही मजुरी करणारे आहेत. कामानिमित्त ते नगरला आले होते. परत जाताना अपघात झाला. नगर तालुका पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे. कंटेनरमध्ये चारचाकी वाहने आहेत, तो नगरकडे येत होता.
संग्रहित लेख, दिनांक 30th Aug 2015 रोजी प्रकाशित
नगरजवळ अपघातात तीन ठार
शहराजवळ, सोलापूर रस्त्यावरील वाळुंज फाटय़ावर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 30-08-2015 at 04:00 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three killed in road accident near nagar