मुंबई : मध्य रेल्वेवरील गाडी क्रमांक ५०१०३ दिवा – रत्नागिरी पॅसेंजरच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिवा – रत्नागिरी पॅसेंजर नवीन वेळापत्रकानुसार बुधवारपासून धावेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गाडी क्रमांक ५०१०३ दिवा जंक्शन येथून दुपारी ३.२० वाजण्याऐवजी ५.५० वाजता सुटेल आणि रोहा येथे त्याच दिवशी ५.२५ ऐवजी रात्री ८.०७ वाजता पोहचेल. नवीन वेळापत्रकानुसार पनवेलला ही गाडी सायंकाळी ६.३० वाजता, आपटा येथे ६.५५ वाजता, जिते येथे ७.०७ वाजता, पेण येथे ७.१९ वाजता, कासू येथे ७.३० वाजता आणि नागोठणे ७.४३ वाजता पोहचेल, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Central railway change diva ratnagiri passenger time mumbai print news zws