देवेश गोंडाणे, लोकसत्ता

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : उच्च शिक्षणात मुलींच्या गुणवत्तेची टक्केवारी वाढत असली तरी मुळातच शिक्षणाच्या प्रवाहात येणाऱ्या मुलींची टक्केवारी कमी होत होत आहे. बारावीच्या निकालाच्या आकडेवारीवरून हे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे.

राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या निकालात मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९३.२९ टक्के तर मुलींचे प्रमाण ९५.३५ टक्के आहे. पण, राज्यात बारावीच्या परीक्षेला बसणाऱ्या मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या १ लाख ३३ हजार १७९ एवढी कमी आहे. यंदा राज्यभरातून बारावीच्या परीक्षेला ७ लाख ८६ हजार ४५५ मुलांनी तर केवळ ६ लाख ५३ हजार २७६ मुलींनी नोंदणी केली होती. हे चित्र केवळ या एकाच वर्षांचे नाही. दरवर्षी मुलींच्या प्रवेशाचा टक्का घसरत चालल्याचे या आकडेवारीवरून दिसून येत आहे. २०२१ मध्ये ७ लाख १० हजार मुलांनी तर ६ लाख ९ हजार मुलींनी नोंदणी केली होती. ही घट १ लाख १ हजार इतकी असून यंदा पुन्हा ३२ हजारांनी मुलींची संख्या घटली आहे. या निकालाच्या मागचे वास्तव समाजाला आत्मचिंतन करायला लावणारे आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra hsc result 2022 pass percentage of girls increased zws