१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटानंतर नाना पाटेकरांनी संजय दत्तबरोबर काम करण्यास दिलेला नकार…
१९९३ सालच्या मुंबई बॉम्बस्फोटात २५७ जणांचा मृत्यू आणि ७१३ जण गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणी अभिनेता संजय दत्तला अटक झाली होती. नाना पाटेकर यांनी या घटनेनंतर संजय दत्तबरोबर काम न करण्याचा निर्णय घेतला होता. याबद्दल ते असं म्हणाले होते, "तुम्ही त्याचे चित्रपट पाहता, त्याला हिरो बनवता आणि नंतर तुम्ही म्हणता की, त्याला पॅरोल मिळू नये. या अशा गोष्टी चालत नाहीत. यानंतर त्यांनी कधीही एकत्र काम केलं नाही. दरम्यान, आता 'हाऊसफुल्ल ५' चित्रपटात दोघे एकत्र दिसणार आहेत.