अमिताभ यांच्या चित्रपटांचे रिमेक करून दाक्षिणात्य इंडस्ट्री टिकली; दिग्दर्शकाचं वक्तव्य
दाक्षिणात्य चित्रपटांना देशभरातून मिळणारा प्रतिसाद पाहता, तामिळ, तेलुगू, मल्याळी चित्रपटांचे चांगले दिवस सुरू आहेत. हिंदी चित्रपटांमध्येही दाक्षिणात्य कलाकार झळकतात आणि दाक्षिणात्य चित्रपट हिंदीत डब होतात. पूर्वी दाक्षिणात्य चित्रपटांना कमी प्रतिसाद मिळत असे, त्यामुळे ते हिंदी चित्रपटांचे रिमेक बनवत. राम गोपाल वर्मा यांनी सांगितले की, अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटांचे रिमेक बनवून रजनीकांत, चिरंजीवी प्रसिद्ध झाले. वर्मा यांनी 'सत्या', 'रंगीला', 'कंपनी', 'सरकार' यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.