“… तर पाकिस्तानचे चार तुकडे झाले असते”, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय सैन्यदलाचे कौतुक करण्यासाठी विविध लष्करी तळांना भेटी देत आहेत. आज त्यांनी गोव्यातील आयएनएस विक्रांतवरील अधिकारी आणि खलाशांची भेट घेतली. त्यांनी नौदलाचे कौतुक करताना म्हटले की, ऑपरेशन सिंदूर दरम्यान नौदल उतरले असते तर पाकिस्तानचे चार तुकडे झाले असते.