इराणमध्ये अपहरण झालेल्या तीन भारतीयांची सुटका; १ कोटीची मागितली होती खंडणी
ऑस्ट्रेलियाला नोकरीच्या निमित्ताने जाणाऱ्या तीन भारतीयांचं इराणमध्ये अपहरण झालं होतं, पण आता त्यांची सुटका करण्यात आली आहे. हुशनप्रीत सिंग, जसपाल सिंग, आणि अमृतपाल सिंग हे तिघे १ मे पासून बेपत्ता होते. तेहरान पोलिसांनी दक्षिण तेहरानमधील वरमिन येथे कारवाई करून त्यांची सुटका केली. इराणी दूतावासाने या घटनेची पुष्टी केली असून, संबंधित न्यायिक अधिकाऱ्यांशी समन्वय साधला जात आहे.