पुण्यातील पावसामुळे झालेल्या नुकसानावरुन आता राजकारण सुरु झालं असून बारामतीच्या खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी यासाठी भाजपाला जबाबदार धरलं आहे. दोन वर्षापुर्वी कात्रज येथील संरक्षक भिंत कोसळली होती. त्यावर कोणत्याही प्रकाराच्या उपाय योजना, महापालिकेतील सत्ताधारी भाजपाकडून करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे आजच्या पावसामुळे झालेल्या नुकसानाला भाजप जबाबदार असून आता हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पालकमंत्री अजित पवार यांच्याकडून उद्या मार्गदर्शन घेणार असल्याचे खासदार सुप्रिया सुळे सांगितले.