गेल्या काही दिवसांत देशात महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. दैनंदिन वापरातील अनेक गोष्टींच्या किमती गगनाला भीडत आहेत. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. उद्या (२७ एप्रिल) स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं इचलकरंजी येथे जनआक्रोश मोर्चाचं आयोजन केलं आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हे या आंदोलनाचं नेतृत्व करणार आहेत.