नव्या संसद भवनाच्या वादावर संजय राऊत सातत्याने टीका करत असताना भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उत्तर दिलं आहे, ‘अहंकार उद्धव ठाकरे आणि शिल्लक सेनेत किती ठासून भरलाय हे देशाला माहिती आहे. केवळ स्वतःच्या अहंकारापाई उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्ववादी विचारांना तिलांजली वाहिली आणखी मुद्दा लोकशाहीची शोभा वाढविण्याची भाषा शिल्लक सेना करतेय. २०१९ला महाराष्ट्राने कल देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाला दिला होता, हे जगजाहीर आहे. तेव्हा लोकशाहीची हत्या केली आणि आता शोभा वाढवण्याच्या बाता करता?’ अशी टीका उपाध्ये यांनी केली आहे.