गेल्या वर्षभरापासून राज्यात वेगाने नाट्यमय घडामोडी घडत आहेत. राजकीय नाट्याचे विविध अंक महाराष्ट्रासमोर सादर होत असतानाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं होतं. २ मे रोजी झालेल्या या कार्यक्रमात प्रचंड गोंधळ झाला. अध्यक्ष पदावरून निवृत्त होत असल्याची घोषणा होताच राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी भावूक झाले. यावरून अनेकांनी शरद पवारांची समजूत काढली. त्यांनी निवृत्त होऊ नये, अशी विनंती होऊ लागली. मात्र, शरद पवारांच्या याच निर्णयावर अजित पवारांनी आता थेट हल्लाबोल केला आहे.