मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील रस्त्यांच्या स्थितीवरुन पुण्यात पत्रकार परिषद घेत नाराजी व्यक्त केली. राज ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना लक्ष्य करत टीका केली. ‘केंद्रात मराठी मंत्री असतानाही, महाराष्ट्राचं दुर्देव आहे अशा शब्दांत त्यांनी टीका केली आहे. तसंच सर्व नेते निर्ढावलेले, निर्ल्लज असून यासाठी समाजच जबाबदार आहे असा संतापही राज ठाकरेंनी व्यक्त केला’ त्याचसोबत ‘काही केलं तर आपल्याला मतदान होणार असा विश्वास असल्याने असंच प्रशासन मिळणार’ असंही राज ठाकरे म्हणाले.