Sanjay Raut: इंडियाची बैठक आणि लाठीचार्जची घटना, संजय राऊतांचा सरकारवर आरोप
शासन आपल्या दारी कार्यक्रमाला गालबोट लागू नये म्हणून मराठा समाजाचं आंदोलन सरकारने चिरडल्याचा आरोप खासदार संजय राऊतांनी केला आहे. लाठीचार्जसाठी मंत्रालयातून अदृश्य फोन कोणाचा आला होता? मुख्यमंत्री, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री की दिल्लीतून हा फोन होता? हे सत्य देखील चौकशीतून बाहेर यायला हवं, असंही संजय राऊत म्हणाले.