वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गट यांची युती झाल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. एकीकडे यामुळे ठाकरे गटाला प्रकाश आंबेडकरांची मदत होईल असं मानलं जात असताना दुसरीकडे महाविकास आघाडीत त्यांच्या समावेशावर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित झालं. काँग्रेस व राष्ट्रवादीशी असणारे प्रकाश आंबेडकरांचे वाद सर्वश्रुत असताना आता या तिघांमध्ये एकमक घडवून आणण्याची जबाबदारी आपसूकच उद्धव ठाकरेंवर येऊन पडली आहे. या पार्श्वभूमीवर वंचितच्या मविआमधील समावेशाबाबत ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी सूचक विधान केलं आहे.