पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने पाकिस्तान व पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी तळावर ऑपरेशन सिंदूरच्या माध्यामातून कारवाई केली आहे. यानंतर पाकिस्तानही भारतीय हद्दीत हल्ले करण्याचा अयशस्वी प्रयत्न करता आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर खोटे दावे करणाऱ्या अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत.