Raj Thackeray On Mumbra Thane Train Accident : रेल्वेमध्ये होणाऱ्या अपघातांना मुंबईत परप्रांतीयांचे येणारे लोंढे कारणीभूत असून, रेल्वेसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. ‘मंत्री परदेश दौरे करून तेथे काय पाहतात, हे त्यांनाच माहीत. तेथील रेल्वे आणू नका; पण त्यांच्याकडे अपघात का होत नाहीत, हा विचार तरी आणा’ अशी टीका त्यांनी केली.