राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित संकल्प शिबिर मुंबईत पार पडलं. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना संबोधित केलं. निवडणुकीच्या निमित्ताने आता अनेकजण या पक्षात त्या पक्षात जाणार अशा बातम्या येतील. अनेकजण आपल्या पक्षात येण्याची इच्छा बाळगताहेत. त्यामुळे त्या त्या जिल्ह्यात आपण बेरजेचं राजकारण करावं, असा संदेश जयंत पाटलांनी दिला आहे.