त्रिभाषा सुत्रानुसार शाळेत पहिलीपासून केल्या जाणाऱ्या हिंदी भाषेच्या सक्तीवरून सर्वच स्तरातून विरोध केला जात आहे. राजकीय, सामाजिक तसंच कला क्षेत्रातील काही मंडळींनी याविरोधात आवाज उठवत तिसरी भाषा म्हणून हिंदी हवीच कशाला? असा प्रश्न उपस्थित केला आहे. विरोधाच्या या पार्श्वभूमीवर आता सरकारने एक पाऊल मागे घेत सर्व संबंधितांशी चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थिती पार पडलेल्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याविषयी सविस्तर जाणून घेऊ