देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सोमवारी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला. राजीनामा देताना त्यांनी आपल्या प्रकृतीचं कारण पुढे केलं आहे. मात्र या राजीनाम्यामागे वेगळंच कारण असल्याचा दावा खासदार संजय राऊतांकडून केला जात आहे. सप्टेंबरमध्ये दिल्लीमध्ये मोठी उलथापालथ होऊ शकते. त्याची ही पहिली विकेट पडलेली आहे, असं राऊत म्हणाले.