मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आंदोलकांचं शिष्टमंडळ मुंबईकडे रवाना झालं आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसह इतर मागण्यांसाठी २९ ऑगस्ट रोजी जरांगे मुंबईत आंदोलन सुरू करणार आहेत. या आंदोलनाच्या पूर्व तयारीसाठी आज हे शिष्टमंडळ आझाद मैदानासह इतर मैदानाची पाहणी करणार आहेत. दरम्यान मुंबईकडे शिष्टमंडळ रवाना होण्याआधी जरांगे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत मुंबईतून माघारी फिरणार नाही, असा इशारा जरांगे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह दोन्हीही उपमुख्यमंत्र्यांना दिला आहे.