पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम हे शासकीय बंगल्यात राहण्यास येण्यापूर्वी त्या बंगल्यातील मौल्यवान वस्तू गायब झाल्याची घटना घडली. त्या पार्श्वभूमीवर मनसेचे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर हे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह जाब विचारण्यासाठी गेले होते. त्यावेळी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडून मनसे कार्यकर्त्यांना अर्वाच् भाषा वापरल्याचा आरोप करण्यात आला.त्यामुळे संतापलेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी महापालिका आयुक्त यांच्या दालनाबाहेर जवळपास तासभर ठिय्या आंदोलन केलं. दरम्यान एकच गोंधळ निर्माण झाला होता.