शिवसेनाप्रमुखांनी आमचे अश्रू पुसले आणि आम्हाला लढायलाही शिकवले. सर्वसामान्य, फाटक्या कार्यकर्त्यांला, शेतकऱ्याला, अगदी कामगारालाही त्यांनी मान आणि प्रतिष्ठा मिळवून दिली, अशा शब्दात माजी मंत्री शशिकांत सुतार यांनी बाळासाहेबांना श्रद्धांजली अर्पण केली. आमचे दैवत आज निघून गेले आहे. मराठी माणसाचा तारणहार आणि मराठी माणसासाठी लढणारा नेता हरपला आहे. बाळासाहेबांनी मराठी माणसाचे अश्रू पुसले आणि मराठी माणसाला लढायलाही शिकवले. त्यांनी कधीच जातीपातीचे राजकारण केले नाही. राजकीय हित आणि राष्ट्रहित असा प्रश्न जेव्हा निर्माण झाला तेव्हा तेव्हा त्यांनी राष्ट्रहित पाहिले. मराठीची टिंगल करणाऱ्यांना त्यांनी त्यांच्याच भाषेत उत्तर दिले, असेही सुतार म्हणाले.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 18-11-2012 at 01:58 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: He has given status to common man