scorecardresearch

बीसीसीआय News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (Board of Control for Cricket in India) ही भारतातील क्रिकेट खेळासाठीची राष्ट्रीय प्रशासकीय संघटना आहे. या संघटनेद्वारे देशामध्ये क्रिकेट संबंधित सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवले जाते. १७५१ मध्ये भारतातील पहिला क्रिकेटचा सामना खेळला गेला असे म्हटले जाते. १७९२ मध्ये कोलकाला क्रिकेट क्लबची स्थापना झाली. हळूहळू भारतामध्ये क्रिकेट क्लब्सची स्थापना होत गेली. १९१२ मध्ये भारतीय संघाचा पहिला दौरा इंग्लंड येथे नेण्यात आला होता. पटयालाचे महाराज या संघाचे नेतृत्त्व करत होते. दरम्यानच्या भारतामध्ये क्रिकेट खेळाबाबत लोकांमध्ये कुतूहल निर्माण होत गेले. देशभरात या खेळाला प्रोत्साहन मिळावे यासाठी देशातील विविध भागातून क्रिकेट क्लब्समधील प्रतिनिधी धडपड करु लागले. पटयाला, दिल्ली, बडोदा, पंजाब अशा वेगवेगळ्या प्रांतातील प्रतिनिधींद्वारे २१ नोव्हेंबर १९२७ मध्ये दिल्लीमध्ये एका बैठकीचे आयोजन केले गेले. या बैठकीमध्ये भारतामध्ये क्रिकेट बोर्डची स्थापना व्हावी यावर सर्वांचे बहुमत झाले. यातून पुढे डिसेंबर १९२८ मध्ये बीसीसीआय म्हणजेच बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया या संस्थेची स्थापना करण्यात आली. १९३० मध्ये मद्रास सोसायटी अ‍ॅक्ट अंतर्गत बीसीसीआयची अधिकृत नोंदणी करण्यात आली. आर.ई. ग्रँट गोवन हे बीसीसीआयचे पहिले अध्यक्ष होते. सौरव गांगुलीनंतर रॉजर बिन्नी या संस्थेच्या अध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ हे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड्सपैकी एक आहे. मुंबईमधील वानखेडे स्टेडियमजवळ बीसीसीआयचे मुख्यालय आहे.Read More
mithun manhas elected as 37th bcci president in agm mumbai roger binny retires sports news
Mithun Manhas BCCI President : ‘बीसीसीआय’च्या अध्यक्षपदी मिथुन मन्हास यांची निवड

मिथुन मन्हास ‘बीसीसीआय’चे एकूण ३७वे अध्यक्ष असून हे पद सांभाळणारे सलग तिसरे माजी क्रिकेटपटू ठरतील. याआधी सौरव गांगुली आणि रॉजर…

BCCI New Rule makes compulsory for U-19 U-16 Players to play at least one First Class game to eligible for IPL
BCCIचा नवा नियम, वैभव सूर्यवंशीप्रमाणे अंडर-१६ आणि १९चे खेळाडू IPL मध्ये खेळू शकणार नाहीत!

BCCI New Rule for IPL: बीसीसीआयने आयपीएलसंबंधित एक नवा नियम जाहीर केला आहे. ज्यामध्ये आता वैभव सूर्यवंशीसारखे १४-१५ वर्षीय खेळाडू…

Mithun Manhas BCCI President 2025
Mithun Manhas : मिथुन मन्हास यांची BCCI च्या अध्यक्षपदी निवड, कोण आहेत मिथुन मन्हास? जाणून घ्या!

Mithun Manhas : दिल्लीचे माजी कर्णधार मिथुन मन्हास यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदी निवड झाली आहे.

BCCI complaint
‘बीसीसीआय’ची फरहान, रौफविरोधात तक्रार; ‘पीसीबी’चीही सूर्यकुमारविरोधात ‘आयसीसी’कडे धाव

गेल्या रविवारी झालेल्या ‘अव्वल चार’ फेरीच्या सामन्यात पाकिस्तानचा सलामीवीर साहिबझादा फरहानने अर्धशतक पूर्ण केल्यानंतर बॅटचा बंदुकीसारखा वापर करताना हवेत गोळ्या…

irfan pathan jasprit bumrah (1)
Irfan Pathan: “मी सिलेक्टर असतो, तर बुमराहच्या जागी ‘या’ खेळाडूला संधी दिली असती”, इरफान पठाणचं मोठं वक्तव्य

Irfan Pathan On Jasprit Bumrah: भारतीय संघाचा माजी खेळाडू इरफान पठाणने जसप्रीत बुमराहबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

team india
IND vs WI: अभिमन्यू इश्वरन, करूण नायर OUT! इंग्लंड दौऱ्यासाठी स्थान मिळालेल्या ‘या’८ खेळाडूंना BCCI ने दिला डच्चू

Team India Squad: भारत आणि वेस्टइंडिज यांच्यातील कसोटी मालिकेसाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. शुबमन गिलकडे कर्णधारपदाची सूत्रं देण्यात…

Shreyas Iyer
India A Squad: श्रेयस अय्यरकडे वनडे संघाचं कर्णधारपद! BCCI कडून भारतीय अ संघाची घोषणा

India A vs Australia A, Team India Squad: ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी भारतीय अ संघाची घोषणा करण्यात आली आहे. या…

Rauf and Farhan courted controversy with their gestures
बंदूक दाखवणारा फरहान आणि विमान पाडल्याचे हातवारे करणाऱ्या रौफच्या अडचणी वाढणार? BCCI ची आयसीसीकडे तक्रार

BCCI Complaint Against Pakistan: भारत-पाकिस्तान यांच्यादरम्यान झालेल्या आशिया चषकाच्या दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानी खेळाडूंनी आक्षेपार्ह हातवारे, कृती केल्याच्या विरोधात बीसीसीआयने तक्रार…

Shreyas Iyer wants break from Test cricket Due to Back Injury Informs BCCI
श्रेयस अय्यरचा कसोटी क्रिकेटमधून ब्रेक घेण्याचा धक्कादायक निर्णय, BCCIला दिली माहिती

Shreyas Iyer: श्रेयस अय्यरने भारत अ संघाचे कर्णधारपद सोडत अचानक संघातून माघार घेतली. त्यानंतर आता त्याने कसोटी क्रिकेट न खेळण्याचा…

Mithun Manhas BCCI nomination news
‘बीसीसीआय’ अध्यक्षपदासाठी मिथुन मन्हासला पसंती? दिल्लीच्या माजी क्रिकेटपटूचा उमेदवारी अर्ज दाखल

आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याचा अनुभव नसलेल्या मन्हासने रविवारी ‘बीसीसीआय’च्या मुंबईतील मुख्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

BCCI secretary Devajit Saikia news
विश्वविजेतेपदाबाबत आशावाद! महिला एकदिवसीय विश्वचषकाबाबत ‘बीसीसीआय’ सचिवांचे वक्तव्य

भारतीय महिला संघाला यंदा विश्वचषक स्पर्धा मायदेशात खेळण्याची संधी मिळणार असून स्पर्धेला ३० सप्टेंबरपासून सुरुवात होईल.

ताज्या बातम्या