गणेश विसर्जन २०२५ News
महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) अष्टविनायक यात्रा फार प्रसिद्ध आहे. मुंबईसह महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यामध्ये साजरा केला जातो. गणेश चतुर्थीला बाप्पाचे आगमन होते आणि दहा-अकरा दिवसांनंतर बाप्पा अनंत चतुर्दशी रोजी आपल्या गावी जायला निघतो. या काही दिवसांच्या कालावधीमध्ये भक्तजण रमून गणेशाचे सेवा, आराधना करतात. दीड, पाच दिवसांनी बाप्पाचे विसर्जन केले जाते. सार्वजनिक गणपती दहाव्या-अकराव्या दिवशी विसर्जित केले जातात. गणेश विसर्जनाच्या वेळी मुंबई पाहण्यासारखी असते. रस्त्यांवर दुतर्फा गर्दी असते.
पुण्यामध्ये मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी लोक येत असतात. महाराष्ट्रभर ही धूम पाहायला मिळते. कोकणामध्ये (Konkan) पारंपारिकरित्या नदीमध्ये विर्सजन केले जाते. हिंदू दिनदर्शिकेनुसार २०२४ मध्ये बाप्पा ऑगस्टच्या शेवटी आपल्या घरी येतील. २७ ऑगस्टला बाप्पाचे आगामन होईल तर ६ सप्टेंबरला अनंत चतुर्दशी असेल.
Read More