महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) अष्टविनायक यात्रा फार प्रसिद्ध आहे. मुंबईसह महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यामध्ये साजरा केला जातो. गणेश चतुर्थीला बाप्पाचे आगमन होते आणि दहा-अकरा दिवसांनंतर बाप्पा अनंत चतुर्दशी रोजी आपल्या गावी जायला निघतो. या काही दिवसांच्या कालावधीमध्ये भक्तजण रमून गणेशाचे सेवा, आराधना करतात. दीड, पाच दिवसांनी बाप्पाचे विसर्जन केले जाते. सार्वजनिक गणपती दहाव्या-अकराव्या दिवशी विसर्जित केले जातात. गणेश विसर्जनाच्या वेळी मुंबई पाहण्यासारखी असते. रस्त्यांवर दुतर्फा गर्दी असते.
पुण्यामध्ये मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी लोक येत असतात. महाराष्ट्रभर ही धूम पाहायला मिळते. कोकणामध्ये (Konkan) पारंपारिकरित्या नदीमध्ये विर्सजन केले जाते. हिंदू दिनदर्शिकेनुसार २०२४ मध्ये बाप्पा सप्टेंबरच्या सुरुवातीला आपल्या घरी येतील. ७ सप्टेंबरला बाप्पाचे आगामन होईल तर १७ सप्टेंबरला अनंत चतुर्दशी असेल. Read More
पीओपीपासून तयार केलेल्या मोठ्या आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तीं विसर्जनाच्या मुद्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी आणखी तीन आठवड्यांची मुदत देण्याची मागणी…
पीओपी गणेश मूर्तीवरील बंदी उठली असली तरी सार्वजनिक मंडळांच्या मोठ्या गणेशमूर्तींच्या विसर्जनाबाबत सरकारला भूमिरका मांडण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
पीओपीच्या गणेशमूर्तींची निर्मिती आणि विक्रीवरील बंदी न्यायालयाने उठवल्यानंतर आता सार्वजनिक गणेश मंडळांच्या उंच मूर्तींचे नैसर्गिक जलस्रोतात विसर्जन करण्याची मागणी पुढे…
POP Ganesh Idol New Decisions By High Court: पीओपीच्या गणेशमूर्तींबाबत न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने स्वागत केले…