दिनांक २०, २१, २२ या तीन दिवसांत कोणतेही काम करताना सारासार विचार करा. म्हणजे विचार न करता निर्णय घेणे त्रासाचे राहील. रागाच्या भरात घेतलेले निर्णय चुकीचे ठरू शकतात. विनाकारण धाडस करू नका.
धाडसी निर्णय टाळा. इतरांच्या काही गोष्टी पटल्या नाहीत तर सोडून द्या, पण तुमचे मत दुसऱ्यावर लादू नका. सध्या कामावर लक्ष देण्याव्यतिरिक्त कोणत्याच गोष्टीला महत्त्व देऊ नका. आपण आपले प्रयत्न करत राहणे हेच उत्तम राहील. वादविवादापासून लांब राहा. अमावास्या कालावधीत शांत राहा.
व्यवसाय वाढवण्यासाठी जाहिरात माध्यमांचा वापर सध्या तरी करू नका. नोकरदार वर्गाने कामाचे नियोजन करावे. खर्च कमी कसा होईल ते पाहा. कुटुंबाची काळजी घ्या. आरोग्य जपा.
शुभ दिनांक : १८, १९
महिलांसाठी : कोणावरही अवलंबून राहू नका.










