भारत आणि पाकिस्तानने संयम पाळावा आणि जैसे थे स्थितीत एकतर्फी बदल करणारी व दोन्ही देशांमधील तणाव वाढण्यास कारणीभूत होणारी कृती टाळावी, असे चीनने म्हटले आहे. काश्मीरमधील स्थितीबाबतही चीनने चिंता व्यक्त केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लडाखची स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश म्हणून निर्मिती करण्यात आली त्यालाही चीनने आपला विरोध दर्शविला आहे. अन्य देशांच्या अंतर्गत प्रश्नांबाबत भारत कधीही भाष्य करीत नाही आणि अन्य देशांकडूनही भारताची हीच अपेक्षा आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रविशकुमार यांनी म्हटले आहे. तर  हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ऐतिहासिक वारशाचा प्रश्न आहे, असे चीनचे प्रवक्ते हुआ चुनिंग यांनी म्हटले आहे.

स्थिती शांततापूर्ण

जम्मू-काश्मीरच्या तीन प्रदेशांमधील स्थिती शांततापूर्ण आहे, असे श्रीनगरच्या पोलीस उपायुक्तांनी सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indo pakistan should have patience abn