पीटीआय, आगरतळा : आगरतळा व मुंबईदरम्यान थेट रेल्वे गाडी सुरू केल्याबद्दल त्रिपुराचे परिवहनमंत्री सुशांत चौधरी यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी व रेल्वेमंत्री अश्वनी वैष्णव यांचे आभार मानले. ही गाडी दुर्गापूजा उत्सवापूर्वी सुरू होण्याची शक्यता आहे. मुंबई व गुवाहाटीदरम्यान धावणारी लोकमान्य टिळक टर्मिनस-गुवाहाटी एक्स्प्रेस आठवडय़ातून एकदा आगरतळापर्यंत धावेल, असे ईशान्य सीमा रेल्वेच्या निवेदनात म्हटले आहे. ‘आगरतळय़ाला मुंबईशी जोडल्याबद्दल आम्ही पंतप्रधान व रेल्वेमंत्र्यांचे अभिनंदन करतो. राज्य सरकार दीर्घकाळापासून मुंबईशी थेट संपर्काची मागणी करत होते आणि आता ती पूर्ण झाली आहे’, असे चौधरी यांनी पत्रकारांना सांगितले.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 01-10-2023 at 00:09 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai tripura direct train from durga puja festival ysh