देशातील जनता पंतप्रधान आणि भाजप सरकारच्या कारभाराला कंटाळली आहे, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाब नबी आझाद यांनी केली आहे. ते शनिवारी पाँडेचरी येथील एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, जनतेला पुढील तीन-साडेतीन वर्ष थांबायची इच्छा नाही. त्यांना मध्यावधी निवडणुका व्हाव्यात असे वाटत असल्याचे आझाद यांनी सांगितले. देशातील जनता पंतप्रधानांच्या कारभार आणि दीर्घकाळच्या प्रतिक्षेमुळे कंटाळली आहे. जनतेला अजूनही मोदींची भाषणे ऐकायला आवडतात. मात्र, जेव्हा पंतप्रधान आणि भाजपच्या कामगिरीचा विचार वेळ येते तेव्हा ती शून्य आहे, असे गुलाब नबी आझाद यांनी सांगितले.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 13-02-2016 at 16:30 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: People fed up with the prime minister bjp ghulam nabi azad