पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पत्रकारांना घाबरतात असा आरोप राज ठाकरेंनी इचलकरंजीतल्या सभेत केला. या देशाला स्वप्नं दाखवून पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं मोदी खोटं बोलत आहेत असाही आरोप राज ठाकरेंनी केला. तसेच पंतप्रधान झाल्यापासून आजपर्यंत एकही पत्रकार परिषद पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली नाही. कारण ते पत्रकारांच्या प्रश्नांना घाबरतात असा आरोप राज ठाकरेंनी केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेहरू देशाचे पंतप्रधान होते तेव्हापासून पत्रकार परिषद घेण्याची पद्धत आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्तापर्यंत एकदाही पत्रकार परिषद बोलावलेली नाही. फक्त प्रसारमाध्यमांची मुस्कटदाबी करणं यांना माहित आहे अशीही टीका राज ठाकरेंनी केली. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान म्हणतात की मोदी पुन्हा भारताचे पंतप्रधान व्हायला हवे.. शत्रू राष्ट्राचा पंतप्रधान हा आपल्या देशात कोण निवडून यावा हे का बोलतोय? काय कटकारस्थान आहे ह्या मागे त्याचा शोध लागला पाहिजे असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे या देशावरचे कलंक आहेत असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हिटलरच्या वाटेवर देश नेऊ पहात आहेत. हिटलरनेही हीच नीती वापरली होती. आता पुन्हा एकदा नरेंद्र मोदींनाही देशात हुकूमशाहीच आणायची आहे अशीही टीका राज ठाकरेंनी केली. गोबेल्सची नीती पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अवलंबली जाते आहे. देशात अस्थिरता निर्माण करायची, धर्माच्या नावावर लोकांमध्ये भांडणं लावायची आणि आपला राजकीय स्वार्थ साधायचा हे या सरकारचं धोरण आहे असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prime minister narendra modi is afraid of reporters says raj thackeray