Indian Mango Destinations : आंबा हा फळांचा राजा मानला जातो. यात हापूस आंब्याची प्रजाती सर्वोच्च स्थानी आहे. फक्त उन्हाळ्यात मिळणारे हे फळं आवडत नाही असे म्हणणारे फार कमी असतील. यामुळे आंब्यासाठी अनेकजण उन्हाळ्याची वर्षभर वाट बघत असतात. अतिशय चवदार, स्वादिष्ट आणि आरोग्यदायी हे फळ पाहून स्वत:वर नियंत्रण ठेवणे कठीण होते. यामुळे कितीही पोट भरल तरी आंबा खाण्याला कोण नाही म्हणू शकत नाही. यामुळे भारतात आंब्याचे उत्पादन तर मोठे आहेच सोबत त्याची मागणीही तेवढीच आहे. पण आजवर आपण कोकणातील आंबा जगात प्रसिद्ध असल्याचे ऐकून आहोत. कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी हे दोन जिल्हे आंबा उत्पादनासाठी ओळखले जातात. पण तुम्हाला माहिती आहे का, फक्त कोकणचं नाही भारतात अशी ७ शहरं आहेत जी सर्वोत्तम प्रजातीच्या आंबा उत्पादनासाठी जगात प्रसिद्ध आहेत. चला तर मग जाणून घेऊया भारतात सर्वोत्तम आंबा कुठे मिळतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१) महाराष्ट्र: हापूस

महाराष्ट्रातील अल्फान्सो किंवा हापूस आंबा जगभरात खूप प्रसिद्ध आहे, जो महाराष्ट्रातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग इतर कोकण भागातून येतो. हा आंबा त्याच्या गोड चवीसाठी ओळखला जातो. हापूस ही भारतातील आंब्यांच्या प्रजातीमध्ये सर्वात जास्त विकली जाणारी पहिली प्रजाती आहे.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian mango destinations travel tourism these 8 indian cities have worlds best kind of mangoes sjr
First published on: 23-03-2023 at 15:38 IST