मुंबईतल्या वडाळा अँटॉप हिल भागात चाळीची भिंत कोसळून दुर्घटना घडली. या दुर्घटनेत दोन महिलांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर हळहळ व्यक्त होते आहे. मुंबईतल्या अँटॉप हिल भागातल्या विजय नगर येथील पंजा गल्लीतील ही घटना आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर भिंत कोसळून ही घटना घडली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दोन महिलांचा मृत्यू

चाळीची भिंत कोसळून शोभादेवी मौर्य (वय-४५) आणि झाकिरुन्निसा शेख (वय-५०) अशी या दोन मृत महिलांची नावं आहेत. या दोन महिलांना उपचारांसाठी रुग्णालयात नेण्यात आलं होतं. मात्र तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं.

वडाळा अँटॉप हिल विजय नगर भागातली घटना

मिळालेल्या माहितीनुसार, आज रात्री ९.३० च्या सुमारास ही घटना घडली. चाळीचा काही भाग कोसळला. वडाळा अँटॉप हिलच्या विजय नगरमधील पंजा गल्ली परिसरात ही घटना घडली. चाळीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरील आणि वरच्या तीन मजल्यांवरील भिंतीचा काही भाग कोसळला होता आणि काही भाग लटकलेल्या स्थितीत होता अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. या दुर्घटनेत दोन महिला जखमी झाल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र, या जखमींना रुग्णालयात मृत घोषित करण्यात आलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two women died after a part of a house collapsed in vijay nagar located in the antop hill area of mumbai said bmc scj