नवी मुंबई : वाशीतील एपीएमसी बाजारात हापूसची आवक वाढली असून बाजारभाव उतरले आहेत. वातावरणात उष्मा वाढल्याने आंब्याची तोडणी लवकर केल्याने मंगळवारी बाजारात हापूसच्या सहा हजार पेट्या दाखल झाल्या आहेत. परंतु हापूसची लवकर तोडणी केल्याने बहुतांशी आंबे लहान आकाराचे आहेत.हापूसच्या दरात प्रतिपेटी पाचशे ते हजार रुपयांनी घसरण झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आधी ४ ते ६ डझनांच्या पेटीला साडेतीन ते ७ हजार रुपये दराने विक्री होती, ती आता ३ हजार ६ हजार रुपयांनी होत आहे. यंदा चांगले उत्पादन मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती, परंतु दरम्यानच्या कालावधीत हवामान बदलाने उत्पादनाला फटका बसत आहे. काही दिवसांपासून वातावरणात प्रचंड उष्मा वाढत आहे. हापूसला जादा उन्हाचा तडाखा बसत असून कोकणातील बागायतदार आता आंबा तोडणीवर भर देत आहेत. हापूसला कडक ऊन लागत असून त्याचा दर्जावर परिणाम होत आहे. तसेच आंबे गळून पडत आहेत. त्यामुळे आंबा उत्पादक तोडणी करण्यावर भर देत आहेत.

मार्चपासून कोकणातील हापूस तसेच कर्नाटक, रायगड आंब्यांची आवक वाढली आहे. मात्र कडक उन्हाचा फटका हापूसला बसत असून हापूस बागयतदार यांनी परिपक्व होण्याआधीच तोडणीला सुरुवात केली आहे. बाजारात ८० टक्के लहान तर २० टक्के मोठ्या आकाराचा आंबा दाखल होत आहे.संजय पिंपळे, व्यापारी

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arrival of hapus mango in apmc market in vashi has increased and market prices have come down sud 02