-
अश्विनी महांगडेनं 'अस्मिता' या मालिकेतील मनालीच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं.
-
'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील राणू अक्काच्या भूमिकेतून अश्विनीने प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेतलं.
-
सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अश्विनीचा फॅन फॉलोइंगसुद्धा मोठा आहे.
-
रोजच्या जीवनातील विविध घडामोडी अश्विनी चाहत्यांसोबत शेअर करत असते.
-
अश्विनी महांगडेच्या वडिलांचे १८ मे रोजी करोनामुळे निधन झाले. अश्विनीचे वडील प्रदीपकुमार महांगडे यांनी वयाच्या ५६व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
-
वडिलांच्या निधनानंतर अश्विनीने शेतकामाला सुरुवात केली आहे.
-
'शेतकऱ्याची लेक.. जगणं सोडता येत नाही आणि लढणं थांबवता येत नाही. काही आठवणी जबाबदारीची जाणीव करून देत असतात त्यातलीच एक हळदीची लागवड व भुईंमुंग काढणी. नानांचे हळदीवर विशेष प्रेम असायचे. नाना सोबत असल्याची जाणीव मला प्रत्येक गोष्ट करून देत असते. आयुष्यात टाकेल तिथे व येईल त्या परिस्थितीचा सामना करता आला पाहीजे. हीच नानांची प्रेरणा व शिकवण.'
-
सोशल मीडियावर अश्विनीच्या या फोटोची चर्चा रंगली आहे.
-
अश्विनी छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री असून तिने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. सध्या ती, 'आई कुठे काय करते?' या मालिकेत अनघा ही भूमिका साकारत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अश्विनी महांगडे / इन्स्टाग्राम)

Raj Thackeray PC News: “परत सरकार अशा भानगडीत…”, राज ठाकरेंची हिंदीबाबतच्या निर्णयानंतर भूमिका; म्हणाले, “मोर्चा निघाला असता तर…”