-
दिवाळी म्हटलं की फराळ, मिठाई, गोड पदार्थ याची अगदी पंगत असते.
-
दिवाळीत शंकरपाळी, करंजी, लाडू, नानकटाई, अनारसे यासारख्या अनेक गोडधोड पदार्थांचा फराळात समावेश असतो.
-
पूर्वी दिवाळी म्हटलं की, अनेक जण हवे तितकं हवे तेवढे गोड पदार्थ खायचे.
-
मात्र आता वजन वाढणे, मधुमेह, डायटिंग यासारख्या अनेक कारणांनी लोकांनी मिठाई खाणे बंद केले आहे.
-
पण जर तुम्ही गोड फराळावर ताव मारण्याआधी काही गोष्टी लक्षात ठेवलात, तर तुमची दिवाळी नक्की आरोग्यदायी होईल.
-
अनेकजण सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी गोड पदार्थ खाण्याची सवय असते. पण यामुळे अनेकांना जंताचा त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर लहान मुलांसह मोठ्यांनीही गोड पदार्थ खाणे टाळावे.
-
‘खाने के बाद, कुछ मीठा हो जाये’ असे अनेकदा म्हटलं जातं. आपण सर्वचजण जेवणानंतर गोड पदार्थ खातो. पण यामुळे तुमच्या शरीरात अतिरिक्त कॅलरीज वाढतात. यामुळे तुमचे वजन लवकर वाढू शकते.
-
अनेकांना रात्री झोपण्यापूर्वी गोड खाण्याची सवय असते. काही जण तर अगदी मध्यरात्री उठूनही गोड पदार्थ खातात. पण तुमच्या रक्तातील साखरेच्या प्रमाणात वाढ होऊ शकते. तसेच या सवयीमुळे तुम्हाला मधुमेहाचा धोकाही संभावतो.
-
दिवाळीत किंवा इतर कोणत्याही सणादरम्यान घरात आणलेली मिठाई जास्त काळ फ्रिजमध्ये ठेऊ नका. यामुळे तुम्हाला इन्फेक्शन होण्याचा धोका संभावतो.
-
दिवाळीत काजू कतली, लाडू, गुलाबजाम, बर्फी अशा अनेक गोड पदार्थांवर आपण सर्रास ताव मारतो.
-
मात्र त्याऐवजी कप केक किंवा चॉकलेट असे गोड पदार्थ खा. यामुळे तुमच्या शरीरात रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते.
-
बाजारातील गोड पदार्थांपेक्षा घरगुती मिठाई खावी. यामुळे शरीराला कोणतेही नुकसान होत नाही.
-
घरगुती बनवलेल्या गोड पदार्थांमध्ये साखरेचे प्रमाण नियंत्रणात असते. ज्यामुळे रक्तात साखर वाढण्यापेक्षा ती नियंत्रणात राहते.
-
मधुमेह असणाऱ्या रुग्णांना गोड खाण्याची मनाई असते. पण दिवाळीमुळे अनेकदा बाहेरील गोडधोड पदार्थांवर ताव मारला जातो. पण त्याऐवजी घरगुती मिठाई खावी.
-
जेवणादरम्यान मिठाई खाणे अधिक फायदेशीर आहे. त्यामुळे रक्तातील साखरचे प्रमाण योग्य राहते. तसेच तात्काळ एनर्जीही मिळते.

“पुढील १० वर्षांत फक्त ‘याच’ नोकऱ्या टिकतील”; निखिल कामथ म्हणाले, “शिक्षण…”